पाखरु तुझ्या प्रतिसादामुळे आनंदित आहे
पण त्या आनंदाला पाखराच्या अश्रूंची नाजूक किनार आहे
सतत कोसळणार्या जलधारांप्रमाणे, पाखराचे अश्रू,
सतत तुझ्या आठवणींच्या गर्तेत पडून वहात होते
मात्र पाखराला आज त्या अश्रू वाहण्याबद्दल,
समाधान आहे, कारण...
त्याच अश्रूंनी तर स्वत:चे बलिदान देऊन
तुझी चाहूल पाखराच्या ओंजळीत टाकली.
आज मात्र पाखरु प्रत्येक क्षण
तुझाच विचार करत होतं
तुझ्याशिवाय नवीन जगात पाखराचं मनंच रमत नाहिए
तूच सांग, एकदा लक्ष्मीच्या पाऊलांवर
हृदयकमल अर्पण केल्यावर
जगाच्या पाठीवर पाखरु कोठेही गेलं तरी
त्याचं लक्ष लक्ष्मीच्या पावलांकडे राहणार....नाहीतर कुठे राहणार?
{सागर}
Wednesday, April 28, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment