पाखराचं मन खूपच संवेदनशील आहे
कारण, नव्या थव्यात असलं तरी
पाखरु आतून खूपच एकटं पडलंय
दिवसा तर सगळं स्वच्छ दिसत असतं
त्यामुळे पाखरु दिवसभर मुखवटा वापरतं
वरुन सगळ्यांना पाखरु आनंदात दिसतं
पण मुखवट्याआड पाखरु आक्रंदत असतं
ज्याप्रमाणे अमावस्येनंतर चंद्र कलेकलेने वाढत जातो
तशी तुझ्या आठवणींची तीव्रता क्षणाक्षणाने वाढतेय
कधी कधी पाखराला तुझा खूपच राग येतो
कारण "तुझ्याऐवजी" तुझ्या आठवणी त्याच्याबरोबर आहेत.
{सागर}
Wednesday, April 28, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment